
Ahmednagar Accident : नवीन वर्षानिमित्त कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी जात असणाऱ्या ठाण्यातील कल्याण येथील एका कुटुंबियावर काळाने घाला घातला. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावर दोन गाड्यांची समोरा समोर धडक झाल्याने झायलो कार मधील तिघे जण ठार झाले. तर सात जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.






