
पुढच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना हरवायचं असेल तर २-४ जागा कमी लढवायला मिळाल्या तरी चालतील ही भूमिका सर्व विरोधी पक्षांचीअसली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, या भूमिकेवर ठाम राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाहीत. अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही”, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना लगावला आहे.




