प्रकाश आंबेडकरांचा नांदी न लागल्याचा इशारा, त्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, काय म्हणाले? वाचा

0
14
प्रकाश आंबेडकरांचा नांदी न लागल्याचा इशारा, त्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, काय म्हणाले? वाचा


प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

“आरक्षण हा काही विकास नसून आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. राजे-महाराजांच्या कालावधीत ज्यांना आपण क्षुद्र, दलित म्हणायचो, ज्यांना दरबारात चोपदार होण्याचासुद्धा अधिकार नव्हता. शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर उरलेल्या इतिहासात नव्हताच. शासनात संबंध नव्हता.अशा लोकांना लोकशाहीत, स्वतंत्र देशात आपले हक्क मिळावे. तसेच त्यांचा प्रतिनिधित्व राहावा म्हणून आरक्षण आले. शासनाने विकासाच्या योजना आखल्या नाहीत. आता आपला विकास करुन घ्यायचा असेल तर, आरक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. ओबीसी आणि मराठ्यांचे ताट वेगवेगळे असायला पाहिजे. काही प्रश्नांचा निकाल १९८० मध्ये निघाला होता, ज्याला ४० वर्ष झाली. मात्र, आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. शासनाच्या न विकसित धोरणांमुळे आज प्रत्येकाला वाटत आहे की, आरक्षण मिळाले तर विकास होईल”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.



Source link