
रविवारी रात्री अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने देशवासीयांची मनं दुखावली गेली. भारताचा पराभव होताच देशभर राडा झाला. दादरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली, मुंबईत एकाने आत्महत्या केली, तर अमरावतीमध्ये मटण खाऊन आल्याने सामना हरल्याचे म्हणत मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. अशातच आता कानपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. फायनल सामना सुरू असताना मुलाने टीव्ही बंद केला म्हणून बापाने मुलाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.








