
[ad_1]
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वाद पेटला असून पंढरपुरातील मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केलं होतं की, कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा असून या परंपरेला विरोध करू नका. पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. यानंतर आपल्या पाच मागण्या समोर ठेऊन मराठा समाजाने आपले आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजेचा मार्ग मोकळा झाला आहे.
[ad_2]
Source link
