
‘आई कुठे काय करते’ मालिकेत आपण काही दिवसांपूर्वी पाहिले की आशुतोषने मुल दत्तक होण्याची इच्छा अरुंधतीसमोर व्यक्त केली. त्यावर अरुंधतीने मला वेळ लागेल या गोष्टीचा विचार करायला असे उत्तर दिले होते. त्यानंतर सुलेखा ताई आश्रमातील मनूला घरी घेऊन येतात. आता मनूशी आशुतोश, अरुंधती, आरोही आणि जवळपास सगळ्यांचाच लळा लागला आहे. पण अरुंधती आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








