
कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलेही जरांगे यांचे भाषण ऐकण्यासाठी वाट पाहत होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या. मात्र, कुणीही घरी गेले नाही. जरांगे पाटील येताच वाट पाहत थांबलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचे जोरदार आणि जल्लोषात स्वागत केले. पहाटेच्या थंडीत संपूर्ण सभा परिसर हा दुमदुमला होता.



