
मनोज जरांगे उपोषण करत असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेतली होती. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर जरांगे यांनी आपले उपोषण आंदोलन मागे घेतले होते. मात्र उपोषण मागे घेतानाच सरकारने अटी मान्य केल्या नाहीत तर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्या साखळी उपोषणाच्या जागृतीसाठी या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. इगतपुरीनंतर जरांगे यांनी पुण्यात भव्य सभा होत आहे.






