
[ad_1]
एसयूव्हीचा वेग बहुधा होता आणि समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला, त्यामुळे ट्रकला धडक बसली.
कोटा: ऐन दिवाळीच्या दिवशी राजस्थानमधे रस्ते अपघाता एका कुटुंबातील चौघांना जिव गमवावा लागला. बुंदी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-52 वर रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील एका कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाला. हे कुटंब मध्यप्रदेशहून पुष्करला जात असताना हिंदोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवी सिंह (50), त्यांची पत्नी मानखोर कंवर (45), भाऊ राजाराम (40) आणि पुतण्या जितेंद्र (20) अशी मृतांची नावे आहेत, ते मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील गंगुखेडी गावचे रहिवासी आहेत. हिंदोली पोलिस स्टेशनचे अधिकारी मनोज सिकरवाल यांनी सांगितले की, हिंदोली शहराजवळ चार जणांना घेऊन जाणाऱ्या एसयूव्हीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात 12.30 च्या सुमारास झाला.
[ad_2]
Source link

