
दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोषला या सगळ्या गोष्टी अनिश सांगतो. अरुंधतीला ईशा चुकीची वागते याची जाणीव होते. अनिश देखील सर्वांना सांगतो की ईशाला आणायला कोणीही जायचे नाही. तिला यायचे असेल तर ती यावेळी येईल. या सगळ्यावर तोडगा म्हणून आरोही घर सोडण्याचा निर्णय घेते. अरुंधती आणि आशुतोष तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र ती थांबायला तयार नसते. आता आरोही खरच थांबणार का? काय असेल यशचा निर्णय? ईशा घरी जाणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहेत.








