
राजस्थानमधील दौसा येथे एका पुलाचे रेलिंग तोडून बस थेट रेल्वे रुळावर पडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ५ गंभीर रुग्णांना जयपूरला रेफर करण्यात आले आहे.
राजस्थानमधील दौसा येथे आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात (Rajastan Bus Accident) झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातली सर्व प्रवासी हे त्यांच्या नातेवाईकाच्या अस्थिविसर्जनासाठी हरिद्वारले गेले होते. परत येताना राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील रेलिंग तोडून खाली थेट रेल्वे रुळावर पडली.
हे सुद्धा वाचा
दौसा डीएम कमर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 2.15 च्या सुमारास जयपूर दिल्ली रेल्वे मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग-21 वर हा भीषण रस्ता अपघात झाला. येथे हरिद्वारहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बसवरी ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, लोखंडी रेलिंग तोडून कल्व्हर्टवरून खाली पडली. कल्व्हर्टवरून बस रेल्वे रुळावर पडल्याची माहिती मिळताच जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस व रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी दाखल झाली.









