
फडणवीस पुढे म्हणाले, ‘जेवढे कडक कायदे आहेत ते सर्व कायदे ड्रग माफियांविरुद्ध लावण्यात येतील. आपण ‘ड्रग-फ्री-महाराष्ट्र’ हे अभियान सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकण्याचं काम सुरू आहे. ही मोठी लढाई लढावी लागणार आहे. आणि ही लढाई राष्ट्रीय स्तरावर लढणे सुरू केले आहे. आपण मोठ्या प्रमाणावर ड्रग माफियांच्या आंतरराज्य हालचाली टिपू शकलो. जे लोकं ड्रगचे कारखाने स्थापन करून लोकांना विष देत होते, अशा सर्व लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. गुन्हेगारांवर तर कारवाई होणारच, परंतु यात ज्या पोलिसांचा सहभाग आढळून येईल त्यांना केवळ निलंबितच नाही तर घटनेच्या कलम ३११ नुसार नोकरीतून बडतर्फ करण्यात येईल.’ असं फडणवीस म्हणाले.






