
मंत्री शंभुराज देसाई, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर हे महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री आहेत. तर खासदार धैर्यशील माने हे तज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १ नोव्हेंबर रोजीच्या काळ्या दिनाला हे मंत्री उपस्थित राहून सीमाभागातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतील, त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिकांत संघर्ष निर्माण होईल, यामुळे त्यांना बेळगाव जिल्हा बंदी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.






