
अग्निशामक विभागाने म्हटले की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीतत १८ बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर चार बसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
गॅरेजमध्ये ३५ बसेस थांबल्या होत्या त्यातील २२ बसेसना आग लागली. गॅरेज मोकळ्या जागेत असल्याने आग लागताच लोक सुरक्षितपणे बाहेर पडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.








