
Samruddhi Highway Accident update: बुलढाणा जिल्ह्यातील सैलानीबाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या नाशिक येथील भाविकांच्या गाडीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यात १२ प्रवासी ठार तर २३ जण जखमी झाले होते. या अपघातामुळे पुन्हा समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरम्यान, हा अपघात आरटीओ पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याचे पुढे आले आहे. दोन आरटीओ अधिकाऱ्यांनी हा ट्रक महामार्गावर थांबल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.






