
समाजात काही चुकीचं दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण त्यामुळे घाबरु नका. सरकार बदलत असतं, त्यामुळे सरकार बदलल्यानंतर त्या केसेस मागे घेतो, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादीचा महिला मेळावा आज मुंबईत पार पडला यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना शरद पवारांनी हे आवाहन केले आहे. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं.



