
फोटोचा किस्सा सांगत हेमांगी म्हणाली, ‘उत्सहाच्या भरात मी पण त्यांना फोटोसाठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईट ही वाटलं! म्हटलं ‘अशाने यांना थकायला होत नसेल का?’ तर तो म्हणाला ‘इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!’ मी मनात म्हटलं ‘गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देवो आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!’ खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!’







