
शाहरुख आणि गौरीची पहिली भेट शाळेत झाली होती. शाळेच्या एका डान्स पार्टीमध्ये शाहरुखने गौरीला पाहिले होते. दोघांमध्ये छान मैत्री झाली. मात्र, प्रेमाच्या पहिल्याच पायरीवर असताना गौरीला मुंबईत स्थायिक व्हावे लागले. तर, गौरीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या शाहरुखनेदेखील तिला शोधण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईसारख्या महानगरात त्याने गौरीला शोधून काढलं आणि २५ ऑक्टोबर १९९१मध्ये तिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना तीन मुले आहेत. आर्यन, सुहाना आणि अब्राम ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.







