Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शांतता समितीची बैठक

[ad_1]

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील वातावरण तापले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील जालना जिल्ह्यात पोलीस आंदोलकांमध्ये राडा पाहायला मिळाला. तर अजूनही जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आंदोलन केलच जात आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीत जालना जिल्ह्यात उद्योग, व्यापारासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था तसेच जनजीवन पूर्ववत होण्यासह शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक, सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना, जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून शैक्षणिक नोंदी, खासरा प्रमाणपत्र तसेच निजामकालीन दाखले मागविले होते. तरी 1960 पूर्वीचे कागदपत्रे शोधून ती शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशांतता पसरविणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवली जाईल. जिल्ह्यात आज शांततेचे वातावरण असून ते अबाधित राहण्यासाठी सर्वांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तर यावेळी बोलतांना पोलिस अधिक्षक बलकवडे म्हणाले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. अंतरवाली सराटी येथील अनुचित प्रकाराचा पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे तपास करण्यात येऊन दोषीविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात कालपर्यंत केवळ 162 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आलेली कलमे कमी करण्याचे अधिकार असून चार्जशिट दाखल करतेवेळी कमी करण्यात येतील.  

नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा

तरुणांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रफितीवर विश्वास ठेवू नये. तसेच फॉरवर्ड करु नये. लाठीचार्जप्रकरणी अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे पारदर्शकपणे तपास करुन चौकशी करत आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा. खरे गुन्हेगार शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांकडे असलेले पुरावे, जबाब, साक्षीदार तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिस अधिक्षक कार्यालयातील विशेष कक्षात जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलन दरम्यान ज्या व्यक्तींनी हिंसा केली त्यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करावी तसेच निरपराध लोकांवरील गंभीर स्वरुपात दाखल गुन्हे मागे घ्यावेत व अनुचित प्रकारची नि:ष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशा सूचना केल्या.  बैठकीस सकल मराठा समाजाचे नागरिक, सदस्य, पदाधिकारी, महिला उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस, शरीरातील पाणी पातळी  कमी झाल्यानं सलाईन  लावण्याचा डॉक्टरांचा निर्णय 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments