
गोपिचंदने वडिलांकडे लग्नाचा हट्ट धरला होता. त्याला वाटत होते की, वडील लग्न जुळवण्यास टाळाटाळ करत आहेत. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोपिचंद याने वडिलांना म्हटले की, माझे लग्न करत नाही, तर तुला मी आता जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून शिवागाळ सुरू केली. रागाच्या भरात त्याने घरासमोर पडलेला फरशीचा तुकडा वडिलांच्या डोक्यात मारला त्याचबरोबर लाकडी फळीच्या तुकडयाने तोंडावर मारहाण केली. या मारहाणीत हुकुम कदम गंभीर जखमी झाले.




