
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केलीय. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपले गट, पक्ष का सोडले याचा संबंध महाराष्ट्राच्या विकासाशी लावू नये, असं राऊतांनी सुनावलंय. तर निधीच्या माध्यमातून हजारो कोटींची लूट होतेय. याची तुलना राऊतांनी मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याने केलेल्या लुटीशी केलीय.







