
यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, शरद पवार मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, संकटकाळात कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही. जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा पंतप्रधान मोदी पाठिशी उभे राहिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी २४१० रुपये प्रति क्विंटल हा भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय.त्यामुळे यात राजकारण करू नये,”असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.






