
भारतीय रेल्वेने उधना ते मडगाव, अहमदाबाद ते कुडाळ आणि उधना ते मंगळुरू या रेल्वेंच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर दोनशेहून अधिक फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकच्या २२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. वसईमार्गे जाणाऱ्या उधना ते मडगाव या रेल्वेच्या १० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. उधना-मंगळुरू या रेल्वेच्या सहा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. ही रेल्वे वसई रोड स्थानकातून जाणार आहे. याशिवाय अहमदाबाद-कुडाळ या रेल्वेच्या सहा अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. या तिन्ही रेल्वे १३ ते २७ सप्टेंबरदरम्यान दर बुधवारी आणि गुरुवारी धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.






