
चांदणी चौकातील जुन्या पुलामुळं अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळं पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. तब्बल ३९७ कोटी रुपयांचा खर्च करत नव्या पुलाचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. त्यामुळं आता कोथरूड-मुळशी, सातारा-मुळशी, मुळशी-पुणे, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण-बावधन आणि पाषाण-मुंबई या मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. नव्या उड्डाणपुलासह काही भुयारी मार्ग देखील तयार करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी दोन सर्व्हिस रोड आणि आठ रॅम्प यासह १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर थोड्याच वेळात तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आहे.






