
या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच कारवाई करतील का? हा प्रश्न आहे. या अगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली असून त्याचं त्यांनी काय केलं, हे सर्वांना माहित आहे. किरीट सोमय्या यांची भाजपमध्ये उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचं आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.





