
मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून यंदा पाऊसमानही कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र,आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.





