
डिसेंबर २०२२ मध्ये, भारतपेने कंपनीच्या निधीचा प्रचंड गैरवापर केल्याबद्दल अश्नीर ग्रोव्हर, त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू केली होती. ग्रोव्हर दाम्पत्यावर कंपनीच्या खात्यातून तब्बल ८१ कोटी रुपये बनावट पावत्या बनवून त्यांच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. आता त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










