
वाघमारेंचं घर आपल्या नावावर करून श्रेयस आणि अश्विनीला घराबाहेर काढायचं हा डाव तिने आखला होता. मात्र, बाबांनी तसे करण्यास नकार दिला आहे. आपलं राहतं घर मी माझ्या दोन्ही मुलांच्या नावावर करणार असा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, संपूर्ण घर एकट्या शिल्पीच्या नावावर करण्यात यावं, असा हट्ट त्यांनी धरला होता. यावर जरी बाबांनी आक्षेप घेतला असला, तरी आईने आपला हट्ट लावून धरला आहे.







