
मात्र, त्यांच्या या आनंदावर एकाकी विरजण पडणार आहे. पाणीपुरी खात असतानाच आशुतोषला एक फोन येतो. हा फोन बघून आशुतोष हादरून जाणार आहे. त्याला आलेला हा फोन वीणा नावाच्या एका मुलीचा असून, इतक्या वर्षांनी ती आपल्याला का फोन करतेय असा प्रश्न त्याला पडला आहे. या वीणाचा केवळ आशुतोषशीच नव्हे तर, त्याची आई आणि केळकर कुटुंबाशीदेखील काहीतरी नातं आहे. त्यामुळे आशुतोष आईपासून देखील ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता ही वीणा नक्की कोण असणार? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.






