
सातारा : “समाजाचा सर्वांगीण विकास हा एकजुटीतूनच शक्य होतो. गटा-तटांच्या राजकारणामुळे समाजाची हानी होते,” अशी भावना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु.डी. बोराडे यांनी व्यक्त केली.
शाहूनगर येथील ग्रामसेवक भवन येथे भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम व पूर्व कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सभेत अशोक भालेराव (पश्चिम) आणि नानासो मोहिते (पूर्व) यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली.
बोराडे पुढे म्हणाले, “पंचशीलाचे पालन करणे ही प्रत्येक धम्मकार्यकर्त्याची जबाबदारी आहे. संविधान जोडो हा संदेश घराघरांत पोहोचला पाहिजे आणि सामाजिक एकजूट भक्कम झाली पाहिजे.”
केंद्रीय कार्यालय प्रमुख एस. के. भंडारे म्हणाले, “सातारा जिल्हा ही बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेली पवित्र भूमी. अशा जिल्ह्यातील संघटन कार्य अधिक जोमाने आणि शिकवणुकीच्या तत्त्वांनुसार व्हायला हवे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये संस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन डॉ. सुभाष जौंजाळे, ट्रस्टी उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख डॉ. एस. के. भंडारे, ट्रस्टी अरुण पोळ, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे, राज्य संघटक (पुणे–सातारा विभाग) दादासाहेब भोसले यांचा समावेश होता.
पश्चिम विभागीय कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष : अशोक भालेराव
सचिव : यशपाल बनसोडे
कोषाध्यक्ष : रुपेश सावंत
संस्कार : मनोज गायकवाड
पर्यटन : आप्पा अडसूळे
संरक्षण : पिराजी सातपुते
कार्यालयीन हिशेब तपासनीस : नंदकुमार काळे
पूर्व विभागीय कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष : नानासो मोहिते
सचिव : सुनील कदम
कोषाध्यक्ष : नंदकुमार शिंदे
संस्कार : अविनाश बारसिंग
पर्यटन : दिलीप सर
संरक्षण : काकडे सर
कार्यालयीन हिशेब तपासनीस : बाळासाहेब जाधव
कार्यक्रमास राजगृहाशी एकनिष्ठ कार्यकर्ते, माजी आजी पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, समता सैनिक दल तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर प्रास्ताविक आणि कामकाजाचा आढावा जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी सादर केला. नवीन कार्यकारिणीमुळे जिल्ह्यातील सर्व गटांचे एकत्रिकरण होऊन संघटन अधिक सक्षम बनेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.







