
Operation Sindhu: इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावानंतर भारताने इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीयांची सुखरूप सुटका केली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिले विमान गुरुवारी आर्मेनियातील येरेवान येथून नवी दिल्लीत पोहोचले. तेहरानमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाशी समन्वय साधून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीने तेहरानमधील भारतीय विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर काढण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.