आरथी जेरथ यांचा कॉलम: चुकीची वक्तव्ये जगभरात‎आपले नॅरेटिव्ह बिघडवतात‎, आपल्याला मोजक्या शब्दांत बोलणारे हवेत‎

0
3
आरथी जेरथ यांचा कॉलम:  चुकीची वक्तव्ये जगभरात‎आपले नॅरेटिव्ह बिघडवतात‎, आपल्याला मोजक्या शब्दांत बोलणारे हवेत‎


  • Marathi News
  • Opinion
  • False Statements Spoil Our Narrative Around The World, We Need Those Who Speak In Fewer Words

7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‎‎‎‎‎‎‎‎२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या हत्याकांडाचे‎खोलवरचे धर्मांध स्वरूप भारताविरुद्ध पाकिस्तानच्या‎छुप्या युद्धाच्या एका नवीन टप्प्याचे संकेत देणारे होते.‎

पूर्वी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ले सुरक्षा‎दलांना व लष्कराच्या छावण्यांना लक्ष्य करत असत,‎परंतु या वेळी दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष्य केले.‎तेही काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा बदलता चेहरा‎दर्शवणाऱ्या पर्यटकांना आणि धर्माच्या आधारावर.‎पाकिस्तानच्या रणनीतीतील बदलाचे पहिले संकेत‎स्वतः लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिले, तेव्हा त्यांनी‎पहलगाम हत्याकांडापूर्वी व नंतर द्विराष्ट्र सिद्धांत मांडून‎म्हटले की हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत, कारण‎ते जीवनाच्या प्रत्येक पैलूत वेगळे आहेत. पहलगाम‎हत्याकांडाने घेतलेले सांप्रदायिक वळण मुनीरच्या‎टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवरही पाहिले पाहिजे.‎अलीकडील वर्षां, कोणत्याही पाकिस्तानी‎लष्करप्रमुखाने काश्मीरवरील पाकिस्तानच्या दाव्यांचे ‎‎समर्थन करण्यासाठी द्विराष्ट्रीय सिद्धांताचा आधार‎घेतलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदी ‎‎सरकारने पाकिस्तानसाठी नवी लाल रेषा ओढली आहे. ‎‎भविष्यातील दहशतवादी हल्ल्यांविरुद्ध हे ‘न्यू नाॅन्मल‎काम करते का हे पाहणे बाकी आहे. भूतकाळातील ‎‎अनुभवांवरून दिसून येते की, पाकिस्तान प्रत्येक वेळी‎नव्या जोमाने प्रत्युत्तर देतो. चिंताजनक बाब म्हणजे‎मुनीरची मानसिकता आपल्यासमोर नवीन आव्हाने‎निर्माण करते. त्यांच्या योजना काय आहेत हे येणारा‎काळच सांगेल, परंतु हेसुद्धा शक्य आहे की, ते त्यांचे‎देशांतर्गत अपयश लपवण्यासाठी या छुप्या युद्धाची‎व्याप्ती वाढवत आहेत.‎

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानकडून भविष्यात‎कोणताही हल्ला झाल्यास त्याला कठोर लष्करी प्रत्युत्तर‎देण्याचा इशारा दिला, पण त्याच वेळी आपल्याला‎धारणांची लढाईही लढावी लागते. नॅरेटिव्ह मजबूत‎ठेवण्यासाठी देशात जातीय तणाव कमी करणे व‎सामाजिक संतुलन राखणे आपल्यासाठी अत्यावश्यक‎आहे. कोणालाही – विशेषतः मुनीरला – आपल्यासमोर‎द्विराष्ट्र सिद्धांताची बढाई मारण्याची संधी देऊ नये.‎पहलगाममधील दहशतवादावर सरकारची प्रतिक्रिया‎स्पष्ट व तीक्ष्ण होती. ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया‎ब्रीफिंगचे नेतृत्व करण्यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम‎मिस्री यांच्यासह दोन वेगवेगळ्या समुदायांतील महिला‎लष्करी अधिकाऱ्यांना निवडून त्यांनी आपल्या‎बहुलवादाचे प्रदर्शन केले. भारताकडून ही एक प्रभावी‎भूमिका होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबाबत‎भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात पाठवलेल्या‎सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांद्वारे केंद्र सरकारने‎बहुलवादाचा संदेश दिला. या शिष्टमंडळात एक‎मुस्लिम नेता व एक शीख चेहरा आहे. ख्रिश्चन समुदाय‎व ईशान्येकडील प्रतिनिधीही आहेत. दुर्दैवाने‎भाजपमधील काही लोकांना सरकारच्या संदेशाचे महत्त्व‎पूर्णपणे समजलेले नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वस्त‎युक्त्या वापरून त्यांनी स्वतःच्या सरकारला लाज‎आणली आहे.‎

मध्य प्रदेशातील भाजपचे राज्यमंत्री विजय शाह यांनी‎कर्नल कुरेशी यांच्याविरुद्ध जातीयवादी टिप्पणी करताना‎अपशब्द वापरले. काही दिवसांनी हरियाणा महिला‎आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी अशोका‎विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अली खान महमूदाबाद‎यांच्याविरुद्ध एका साध्या सोशल मीडिया पोस्टसाठी‎मोहीम सुरू केली, त्यांची मागणी जमिनीवर वास्तव‎आहे. सरकारने १७ मे रोजी आंतरराष्ट्रीय संपर्कासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रतिनिधींची संपूर्ण यादी जाहीर केली आणि दुसऱ्याच‎दिवशी हरियाणा पोलिसांनी महमूदाबादला अटक केली.‎

अशा घटना जगात आपले कथन बिघडवतात. हा‎कठीण काळ आहे व संतुलित प्रतिसादाची आवश्यकता‎आहे. भारत-पाकिस्तान संघर्ष आता युद्धभूमीपासून‎परस्पर-नॅरेटिव्ह, कुशल राजनयिकता व जनसंपर्क‎सरावांच्या सूक्ष्म क्षेत्रात गेला आहे. अशा परिस्थितीत‎विजय शाह व रेणू भाटियांसारखे लोक आपल्याला‎न्याय देत नाहीत. आपल्याला सावधगिरीने बोलू‎शकतील व भारताचा दृष्टिकोन जगासमोर चांगल्या‎पद्धतीने मांडू शकतील अशा लोकांची गरज आहे.‎पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या‎मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एनडीए खासदारांना या वेळी‎अनावश्यक व चिथावणीखोर विधाने करू नका, असा‎इशारा दिला. हा संदेश जबाबदार लोकांपर्यंत पोहोचेल,‎अशी आशा करूया.‎



Source link