Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तान की चीन? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? अमेरिकेच्या Secret Report मुळं...

पाकिस्तान की चीन? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? अमेरिकेच्या Secret Report मुळं अखेर सत्य समोर

पाकिस्तान की चीन? भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? अमेरिकेच्या Secret Report मुळं अखेर सत्य समोर

[ad_1]

India, Pakistan China Relations : पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्करानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर या सैन्य कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला. याच परिस्थितीवर भाष्य करत अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्था (DIA) नं 2025 या वर्षासाठी सादर केलेल्या अहवालात भारत-पाकिस्तान संबंधांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या अहवालानुसार, पाकिस्तान भारताला ‘अस्तित्वासाठी एक धोका’ मानत आहे. तर भारत, चीनला आपला ‘मुख्य विरोधक’ आणि पाकिस्तानला एक ‘सहायक सुरक्षा समस्या’ या दृष्टीकोनातून पाहतोय.

अमेरिकेच्या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीला सध्या संघर्षविराम लागला असला तरीही पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना मिळणारा पाठिंबा आणि भारताकडून त्याचा प्रतिकार करण्यासाठी होणारी सैन्य कारवाई भविष्यातील धोक्याला कारणीभूत ठरू शकते. परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही हेच अमेरिकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात चीनला अमेरिकेसमोरचा सर्वात मोठा लष्करी आणि सायबर धोका म्हणून वर्णन करण्यात आलं असून या अहवालात इराण, उत्तर कोरिया, चीन आणि रशिया हे चार देश एकत्र येऊन अमेरिकेविरोधात राजकीय मोहिम राबवत आहेत असंही नमूद करण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदींचं प्राधान्य लक्षात घेताना…

सध्याच्या घडीला चीनशी लढा देणं, भारताचं वैश्विक नेतृत्त्वं करणं आणि भारताच्या लष्कराला सर्वतोपरि ताकद देऊ करणं या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यस्थानी असल्याचं अमेरिकेच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे.

सदर अहवालामध्ये पाकिस्तानची सैन्यस्थिती आणि चीनकडून मिळणारी लष्करी मदत यावरही कटाक्ष टाकण्यात आला असून, पाकिस्तानकडून सातत्यानं आण्विक शस्त्रसाठा वाढवण्यावर भर दिला जात असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. चीनकडून पाकिस्तान लष्करी आणि आर्थिक मदत घेत असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं असून चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यामुळं भारतीय सीमासंघर्षाचा तणाव आणखी वाढू शकतो ही वस्तूस्थिती नाकारता येत नसल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.  



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments