
- Marathi News
- Opinion
- Pawan K. Verma’s Column, India Cannot Leave Its Security To The World, We Will Have To Fight Terrorism Ourselves
1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
जीवनाप्रमाणेच राजनयातही न बोललेले हे बोलल्यागेलेल्याइतकेच बोलके असते. ट्रम्प यांनी ‘ऑपरेशनसिंदूर’नंतर युद्धबंदीची घोषणा केली – स्पष्टपणे श्रेयघेण्यासाठी – तेव्हा दहशतवादाचे केंद्र म्हणूनपाकिस्तानच्या भूमिकेबद्दल त्यांचे मौन खूपच स्पष्ट होते.मानवी इतिहासातील सर्वात घातक इस्लामिकदहशतवादी हल्ल्याचा बळी अमेरिका कसा विसरेल,जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ट्विन-टॉवर उद्ध्वस्त झालेआणि पेंटागॉनवरही हल्ला झाला.
अल-कायदाच्या ओसामा बिन लादेनच्यादेखरेखीखाली झालेल्या त्या हल्ल्यात २,९७७अमेरिकन लोक मारले गेले, हजारो जखमी झाले, १०अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता नष्ट झालीआणि ४,३०,००० लोकांच्या नोकऱ्या गेल्या. ९/११ ला२००० अतिरिक्त अकाली मृत्यूंसाठी जबाबदार धरले गेले आहे आणि विषारी पदार्थांच्या संपर्कामुळेवाचलेल्यांमध्ये कर्करोगाचा धोका ३०% वाढला.
लादेनला शोधून मारण्यासाठी अमेरिकेला दहा वर्षेलागली आणि त्यासाठी त्यांना मोठी किंमत मोजावीलागली. आणि लादेन कुठे सापडला? तो अबोटाबादमध्ये पाकिस्तान सरकारने दिलेल्या उच्च सुरक्षा घरात त्याच्या कुटुंबासह आनंदाने राहत होता. ही इमारत पाकिस्तानमिलिटरी अकादमीपासून थोड्या अंतरावर होती. यातून पाकिस्तानी स्थापनेचा दहशतवादाशी असलेला संबंधउघड होत नसेल, तर तो आणखी काय करतो?
आजही पाकिस्तानमध्ये असे डझनभर दहशतवादीगट आणि व्यक्ती आहेत, ज्यांच्यावर अमेरिकेने बंदीघातली आहे. यामध्ये मसूद अझहरच्या नेतृत्वाखालीलजैश-ए-मोहंमदचाही समावेश आहे. २०१९ पासून संयुक्तराष्ट्रांनी जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत मसूदचासमावेश आहे. लष्कर-ए-तैयबा व हाफिज सईदच्यानेतृत्वाखालील जमात-उद-दावा या संघटनेलाअमेरिका, युरोपियन युनियन, रशिया व भारतानेहीदहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. २००८ च्यामुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकीर रहमान लाखी संयुक्तराष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध यादीत आहे. १९९३ च्यामुंबई बॉम्बस्फोटांसाठी जबाबदार हिजबुल मुजाहिदीनचानेता सय्यद सलाहुद्दीन व दाऊद इब्राहिमलाही अमेरिकेनेजागतिक दहशतवादी जाहीर केले आहे.
अमेरिकन सरकारच्या दहशतवादाच्या प्रायोजकांच्याअधिकृत यादीत पाकिस्तानला दहशतवाद्यांसाठी“सुरक्षित आश्रयस्थान” म्हणून ओळखले जाते, जिथेदहशतवादी व त्यांचे गट राज्याच्या पाठिंब्यानेदहशतवादी कारवायांची योजना आखू शकतात, निधीदेऊ शकतात, भरती करू शकतात, प्रशिक्षण देऊशकतात आणि कारवाया करू शकतात. पण, अमेरिकाआणि संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेले दहशतवादीपाकिस्तानात मुक्तपणे फिरत आहेत.
हे सर्व असूनही ट्रम्पनी युद्धबंदीची घोषणा करूनभारत व पाकिस्तानला कसे एकत्र आणले?पाकिस्तानपुरस्कृत पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणूनऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते, हे त्यांनामाहीत होते. ज्या देशाने स्वतः पाकिस्तानात आश्रय घेतअसलेल्या लादेनला शोधून ठार मारले होते, त्या देशाचेराष्ट्राध्यक्ष युद्धबंदीनंतरच्या शहाणपणाच्या निर्णयाबद्दलभारत व पाकिस्तान दोघांचेही अभिनंदन कसे करूशकतात, तेही पाकिस्तानपुरस्कृत आंतरराष्ट्रीयदहशतवादाचा निषेध न करता?
अनेक दशकांपासून पाकिस्तानी प्रतिष्ठाननेजबाबदारी टाळत सवलती मिळवण्यासाठी आपल्याभू-राजकीय स्थितीचा फायदा घेण्याची कला आत्मसातकेली आहे. पण, भारताने या दुटप्पी मानकांना कडाडूनविरोध केला पाहिजे. जगाने पाकिस्तानच्या वास्तवाकडेडोळेझाक केली आहेच, पण आयएमएफने पुन्हा एकदाया दहशतवादी देशाला बक्षीस दिले आहे.
पण, भारताला अशा प्रकारे भूतकाळ विसरण्याचीसंधी नाही. आपल्यासाठी पाकिस्तानमधीलदहशतवादाची पायाभूत सुविधा हा अस्तित्वाचा धोकाआहे. हे आपल्यासाठी केवळ भू-राजकीय सौदेबाजीचेसाधन नाही. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्यास्वसंरक्षणाच्या अधिकाराचे धाडसी प्रतिपादन होते.याद्वारे आपण असा संदेश दिला की, निष्क्रिय सहिष्णुतेचेयुग संपले आहे. पण, भारताने निर्णायक भूमिका घेतलीअसली तरी आंतरराष्ट्रीय प्रतिसाद सौम्य होता.दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्याभूमिकेचा स्पष्टपणे निषेध करण्यात जगाचे अपयश हेगंभीर वास्तव अधोरेखित करते की, आपण आपलीसुरक्षा जगावर सोडू शकत नाही. दहशतवादाविरुद्धचेयुद्ध आपल्यालाच लढावे लागेल.