Piracy in India: दहशतवादाचे एकमेव कारण विचारसरणी नाही, पैसा आणि पायरसी हे देखील : माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा

0
19
Piracy in India: दहशतवादाचे एकमेव कारण विचारसरणी नाही, पैसा आणि पायरसी हे देखील : माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा


India Against Piracy: माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी पायरसी देश आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.  ‘दहशतवादी नेटवर्क केवळ विचारसरणीवर टिकत नाहीत, ते पैशावर टिकतात आणि पायरेटेड कंटेंट हा त्यांच्या सर्वात शांत स्त्रोतांपैकी एक आहे. पायरसीमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे, असे माजी राज्यसभा खासदार डॉ. चंद्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एका पोस्टमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पायरसीचा काळा बाजार हजारो कोटी रुपयांचा आहे.

fallback

देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे.

अलिकडच्याच एका मीडिया रिपोर्टनुसार, देशात २२,४०० कोटी रुपयांचा चित्रपट लीक घोटाळा उघडकीस आला आहे.  रेड २, सिकंदर आणि जाट सारखे प्रमुख हिंदी चित्रपट त्यांच्या थिएटर रिलीजच्या एक दिवस आधी ऑनलाइन लीक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.  तथापि, अशा प्रकारे चित्रपट लीक होणे यात चित्रपट क्षेत्रातील आतील व्यक्तींचाच  सहभाग असल्याचे अंगुली निर्देश करत आहे. पायरसीतून मिळवलेले पैसे दहशतवाद पसरवण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

मीडिया पार्टनर्स एशियाच्या विश्लेषणानुसार, जागतिक स्तरावर, भारत ९०.३ दशलक्षाहून अधिक युजर्ससह ऑनलाइन व्हिडिओ पायरसी मार्केटमध्ये अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर इंडोनेशिया (४७.५ दशलक्ष) आणि फिलीपिन्स (३१.१ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो.

 

‘दहशतवादामागे पैसा आणि पायरसी’

पायरसी केवळ मनोरंजन उद्योगाचेच नाही तर संपूर्ण देशाचे नुकसान करते. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, मे २०२५ मध्ये त्यांच्या नियोजित सिनेमा प्रीमियरच्या एक दिवस आधी अनेक चित्रपट लीक झाले होते.

त्याच वेळी, EY-IAMAI अँटी-पायरसी स्टडी २०२४ म्हणजेच द रॉब रिपोर्टनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून एक मोठा घोटाळा सुरू आहे. रिलीजनंतरच्या नेहमीच्या पायरसीपेक्षा वेगळे असलेले हे सुरुवातीचे लीक भारतीय चित्रपट उद्योगात गंभीर चिंता निर्माण करत आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान 

EY-IAMAI आणि ET च्या खुलाशानुसार, २०२३ मध्ये भारतीय मीडिया उद्योगाला पायरसीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. खेदाची बाब म्हणजे सरकार आणि पोलिसांनी या संदर्भात उचलेली सर्व पाऊले अपुरी पडत आहेत.





Source link