‘येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवणे हे पतंजलीचे ध्येय आहे’, या बाबतीत ते किती यशस्वी झालेत? याविषयी जाणून घेऊयात

0
2
‘येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवणे हे पतंजलीचे ध्येय आहे’, या बाबतीत ते किती यशस्वी झालेत? याविषयी जाणून घेऊयात


Patanjali : पतंजली हा भारतातील टॉप FMCG ब्रॅण्ड्सपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या कामकाजात पर्यावरणरक्षणाला आपले सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कंपनी केवळ हरित उपक्रमच हाती घेत नाही तर पर्यावरणासाठी चांगल्या पद्धती देखील अवलंबत आहे. कंपनीचे उद्दिष्ट निसर्गाचे रक्षण करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी पृथ्वी निरोगी करणे आहे.

पतंजलीने आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये पर्यावरणीय काळजीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ते सांगत आहेत की निसर्गालासोबत घेऊन चालायला हवे. सेंद्रिय उत्पादने आणि वातावरण लक्षात ठेवून बनविलेली धोरणे केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत. म्हणूनच, आपण समजूया की पतंजली येणाऱ्या पिढ्यांसाठी निसर्गाचे जतन कसे करत आहे. 

पतंजलीचा पर्यावरणाविषयी दृष्टिकोन : 

पतंजलीचं म्हणणं आहे की, आयुर्वेद आणि पर्यावरण एकमेकांपेक्षा वेगवेगळं नाही आहे. आयुर्वेदासाठी नैसर्गिक औषधी वनस्पती आणि स्वच्छ वातावरण आवश्यक आहे. त्यामुळे पतंजली केवळ आयुर्वेदिक प्रोडक्टच नाही तर निसर्गाची देखभाल सुद्धा करते. कंपनीचा दावा आहे की आरोग्य निरोगी राहणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण निसर्गासोबत मिळून मिसळून राहू. कारण पतंजली केवळ व्यवसायासाठी नाही तर पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. ते बहुतेक त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक प्रतिसादाखाली अशी काम करतात की ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करता येईल आणि आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवता येईल. 

नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवणे : 

पतंजलीने नैसर्गिक साधनसंपत्ती वाचवण्यासाठी अनेक पाऊल उचलली आहेत. कंपनी वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम राबवते. तसेच पाणी वाचवण्याच्या उपक्रमावर काम करतेय. तसेच कंपनीमध्ये अशी उत्पादन बनवली जात आहेत ज्यामुळे पर्यावरणाला अजिबात नुकसान पोहोचत नाही. पाणी स्वच्छ ठेवणे, पावसाचे पाणी गोळा करणे आणि साफसफाई यासारख्या कामांद्वारे नैसर्गिक संसाधने वाचविण्याचा प्रयत्न करणे यासाठी पतंजली प्रयत्न करत आहे. 

पर्यावरणाला नुकसान न पोहोचवता उत्पादन : 

पतंजली उत्पादन आणि पुरवठा कामात अशा पद्धतींचे अनुसरण करते ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. कंपनी असे प्लांट चालवते जे कमी विजेवर चालतात. ज्यातून कचरा कमी उत्पन्न होतो तसेच उत्पन्न झाला तरी त्याला रिसायकल केले जाते. या व्यतिरिक्त पतंजली पाण्याचा वापर काळजीपूर्वक करते. जेणेकरून पाण्याचा अपव्यय कमी होऊ शकेल. विशेषत: भारताच्या भागात जेथे पाण्याच्या कमतरतेबद्दल मोठी समस्या आहे.

पर्यारवण लक्षात ठेवून उत्पादनांचे पॅकेजिंग : 

FMCG सेक्टरमध्ये पॅकेजिंग हे कचऱ्याचा एक प्रमुख स्रोत आहे. पतंजलीने पॅकेजिंगमध्ये अनेक बदल करण्याचा प्रयत्न केला. पतंजलीच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी अधिकतर अशा गोष्टींचा उपयोग केला जातो ज्या मातीत सहज मिसळल्या जातील किंवा दुसऱ्यांदा वापरल्या जाऊ शकतील जसे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक किंवा रिसायकलिंग या पद्धतीने. कंपनी आता सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हळू हळू कमी करत आहे. या हरित पॅकेजिंगमुळे केवळ कचराच कमी होणार नाही तर त्याऐवजी, लोकांना हे देखील समजले आहे की आपण आता पर्यावरणास अनुकूल गोष्टींकडे वळायला हवे. 





Source link