
बेंगळुरूच्या सदाशिवनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. बेंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिनीअर अनुप कुमार आणि त्याची पत्नी राखी यांनी दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केली आणि नंतर या दाम्पत्याने आत्महत्या केली.