”कसा आहे पिक्चर?’ – मी विचारले.”इट्स अ वनटाइम वॉच’ – मला उत्तर मिळाले. ‘चला, पैसे आणिवेळ दोन्ही वाचले,” असे मी स्वतःशीच म्हटले आणिगोष्ट तिथेच संपली. आजकाल अनेक चित्रपट येतातआणि जातात; अशाच प्रकारची वाक्ये कानावर पडतात.खरेतर मी त्या पिढीतील आहे. तेथे ‘शोले” 20 वेळाआणि ‘दीवार” 30 वेळा पाहिली जायची. तुम्ही म्हणाल,आजकाल तसे सिनेमे बनतातच कुठे? तुमचे म्हणणेअगदी रास्त आहे. पण हा प्रश्न फक्त चांगले किंवा वाईटचित्रपट असण्यापुरता मर्यादित आहे की चित्रपटांशीआपले नाते आता बदलले आहे? असाही प्रश्न विचारतायेईल की, काळाशी आपले नाते बदलले आहे आणिचित्रपट 10-20 वेळा न बघणे हे त्याच बदललेल्यानात्याचे एक उदाहरण आहे का? माझे आयुष्य फक्तसिनेमे पाहून किंवा गाणी गुणगुणून बनलेले नाही, तर सिनेमाच्या नजरेतून आयुष्याकडे पाहण्याच्यादृष्टिकोनातून घडले आहे. टी.एस. इलियट म्हणाले, “मी माझे आयुष्य कॉफीच्या चमच्यांनी मोजले आहे.//” मी मात्र हेच विधान अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांच्या संदर्भात म्हणेन. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील अमिताभ! त्यानंतर मात्र माझेत्यांच्या सिनेमांशी अंतर वाढत गेले. कोणी विचारते की अमुक एक घटना घडली तेव्हा तू किती वर्षांची होतीस? तेव्हा मी विचार करू लागते की, जेव्हा ‘दीवार” पाहिलाहोता तेव्हा मी कदाचित इतक्या वर्षांची असेन. म्हणजेच,आमच्या काळावर चित्रपटांची छाप होती आणि आम्हीजणू ‘चित्रपट-काळात” राहत होतो. या दाट आणि खोलनात्याचे अनेक फायदे होते. त्यापैकी एक म्हणजे, आम्हीव्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर उगाच वेळ वायाघालवत नव्हतो. आमच्या मनात कथा, गाणी आणिसंवाद भरलेले असायचे. लोक कबीर किंवा रहिमांचेदोह्यांची उजळणी करतात. तसे आम्ही चित्रपटातीलसंवाद बोलायचो. आमच्यासाठी ते दोह्यांपेक्षा कमीनव्हते. दुःख सगळ्यांवरच येते किंवा ‘कुछ तो लोगकहेंगे..’ वगैरे वगैरे. यांसारख्या गोष्टी आम्हीसिनेमांतूनच शिकलो. समाजात गरिबी, विषमता आणिहिंसेच्या घटना जास्त असतात. तिथे चित्रपटांमुळे एकप्रकारचा दिलासा मिळायचा. कदाचित म्हणूनच आम्हीवारंवार त्याकडे वळायचो. कथा नेहमीच नवीननसायच्या. शेवट काय होणार हे माहित असायचे. पणओळखीचे काहीतरी पाहण्यातही एक वेगळे सुखअसते. असो, व्यवहाराच्या भाषेत सिनेमाचे संवाद आलेकी ते खोटे मानले जात नसे; उलट तो एक अलंकारसमजला जाई. मला आठवते, आई कधीतरी रागावूनवडिलांना म्हणायची— ‘मैं चुप नहीं रहूंगी’, मीनाकुमारीसारखे. मलाही तेच म्हणायचंय! हे ऐकून कोणीहसायचे नाही, उलट तो राग अधिक प्रभावी वाटायचा.आता विचार करा की, एखादा सिनेमा फक्त एकदा पाहूनइतकी सखोल गोष्ट कशी काय बोलता येईल?चित्रपटांची शीर्षके, गाण्यांचे बोल, प्रेम आणि रुसव्याचीअभिव्यक्ती—या संपूर्ण शब्दसंग्रहाने आमची भाषाघडवली आणि सजवली. यातूनच आम्हाला समजले कीवेदना देखील ‘गोड” असू शकतात. मनातले धाडसव्यक्त करायचे असेल तर ‘दिल बेकरार है” म्हणता येत’.कितीतरी गाणी अशी आहेत ज्यात ‘हृदय” (दिल) हेमाध्यम बनले आहे— “मेरे दिल में आज क्या है, तू कहेतो मैं बता दूँ’ वगैरे. कधीकधी डोळेही बरेच काही बोलूनजायचे. ओठांवर भले ‘नकार” असला तरी डोळ्यांत‘होकार” स्पष्ट दिसायचा. समाजात खाजगीपणा नाहीआणि कुटुंबाची नजर सतत तुमच्यावर असते. तिथेतुम्ही कोणाकडे उघडपणे कसे बघणार? तिथे सगळेकाही डोळ्यांवर येऊन थांबायचे. समजूतदारमाणसासाठी इशारा पुरेसा असायचा. त्यामुळे मी पुन्हातिथेच येते. जिथून सुरुवात केली होती. चित्रपटांनावारंवार बघणे, त्यांना आयुष्याचा भाग बनवणे—हे एकाजवळकीचे लक्षण होते. त्या काळाची ती एक गरजहोती. आता आपले शरीर, आपल्या ओळखीची जाणीवआणि काळाबद्दलची आपली विचारसरणी—हे सगळेकाही बदलले आहे. कदाचित माझ्यासाठी या दोनवेगवेगळ्या कालखंडांची तुलना करणे व्यर्थच आहे. “गुझरा हुआ जमाना, आता नही दोबारा, हाफिज खुदातुम्हारा…’ ( हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) चित्रपटांच्या कथा नेहमीच काही नवीननसायच्या. कोणत्या वळणावर कायघडणार आणि शेवट काय होणार, हेआपल्याला आधीच ठाऊक असायचे.म्हणूनच आपण नेहमी काहीतरी नवीनशोधत असतो, असे मानण्याची मुळीचगरज नाही. अन्यथा लोक वारंवाररामलीला पाहायला का गेले असते?
Source link



