
बीडमध्ये गेल्या काही दिवसांत खंडणी, जमिनी बळकावणे आणि बंदुकी दाखवून दहशत पसरवणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत, यात राजकीय अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचेही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. तसेच यापैकी कोणीही बीडमधील जमिनी बळकावल्या असतील, खंडणी मागितली असेल किंवा बंदूक दाखवून दहशत पसरवत असतील तर, ९२३५३५३५०० या क्रमांकावर फोन करण्याची विनंती केली. तसेच सगळी माहिती आणि माहिती देणाऱ्याचे नावे पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.