Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशभारतातील सर्वात खतरनाक एअरपोर्ट! उड्डाण करताना पायलटचे हात पाय थरथरतात; असं आहे...

भारतातील सर्वात खतरनाक एअरपोर्ट! उड्डाण करताना पायलटचे हात पाय थरथरतात; असं आहे तरी काय इथं?

भारतातील सर्वात खतरनाक एअरपोर्ट! उड्डाण करताना पायलटचे हात पाय थरथरतात; असं आहे तरी काय इथं?

[ad_1]

Which Is The Most Dangerous Airport In India: विमान हे प्रवासाचे सर्वात जलद माध्यम आहे. भारतामध्ये विविध राज्यात मिळून एकूण 137 विमानतळं आहेत. यापैकी 34 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 10 सीमाशुल्क विमानतळ, 81 देशांतर्गत विमानतळ आणि 23 संरक्षण हवाई क्षेत्रे विमानतळांचा समावेश आहे. यातील काही  एअरपोर्ट खूपच थरारक आहेत. कारण, इथं ही विमनतळं जिथे आहेत. तेथील भौगिलीक रचना अत्यंत धोकादायक आहे. यामुळे  इथं टेकऑफ आणि लँडिंग करताना पायलटचे हात पाय थरथरतात. जाणून घेऊया.

लेंगपुई विमानतळ

मिझोरममध्ये असलेले लेंगपुई विमानतळ भारतातील सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळाच्या धावपट्टीखाली सतत पाण्याचे प्रवाह वाहत असतात, ज्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती आणखी धोकादायक बनते. अशा वातावरणात येथे विमानांचे  टेकऑफ आणि लँडिंग करणे वैमानिकांसाठी एखाद्या कठीण परीक्षेपेक्षा कमी नसते. 

लेह रिम्पोची विमानतळ

जम्मू – काश्मीरमधील लेह येथे असलेल्या रिम्पोची विमानतळ हे देशातील सर्वात उंच विमानतळ आहे. 3259 मीटर उंचीवर हे विमानतळ आहे. येथे टेकऑफ आणि लँडिंग करणे हा पायलटसाठी अत्यंत धोकादायक अनुभव असतो. जास्त उंची आणि क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण यामुळे येथे विमान नियंत्रित करणे खूप कठीण असते. 

कांगडा विमानतळ

हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे असलेले कांगडा विमानतळ अर्थात गग्गल विमानतळ 2492 फूट उंचीवर आहे. यामुळे याची धावपट्टी खूपच  धोकादायक आहे.   बदलते हवामान आणि उंचीमुळे वैमानिकांना येथे खूपच सतर्क रहावे लागते. 

मंगलोर विमानतळ

मंगलोर विमानतळ हे टेबलटॉप विमानतळ म्हणून ओळखले जाते. 2010 मध्ये येथे एक भीषण विमान अपघात झाला होता. यावरुनच हा विमानतळाचे धोकादायक स्वरूप अधोरेखित झाले. एअर इंडियाचे एक विमान धावपट्टीवरून घसरले आणि टेकडीवरून पडल्यानंतर आग लागली. या धावपट्टीच्या आकारामुळे आणि आजूबाजूच्या भूप्रदेशामुळे, टेकऑफ आणि लँडिंग करणे अत्यंत धोकादायक आहे.

भारतातील या धोकादायक विमानतळांवर फक्त अनुभवी वैमानिकांनाच उड्डाण करण्याची परवानगी दिली जाते. याकारीता वैमानिकांना विविध चाचण्या पार कराव्या लागतात. प्रशिक्षणार्थी वैमानिकांना येथे चुकुनही पाठवले जात नाही. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments