
Saamana Editorial on Republic Day : भारताच्या प्रजासत्ताक दिनी आजही नेहमीप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडले जातील. देश कसा लोकशाही आणि संविधानानुसार चालत आहे याचे दाखले दिले जातील. मात्र, परिस्थिती तशी आहे का? देशाचं संविधान, प्रजेचे घटनात्मक हक्क, अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहेत. प्रजासत्ताक आहे कुठं?, असा भयंकर प्रश्न स्वतःलाच विचारण्याची वेळ देशातील जनतेवर आली आहे, अशी बोचरी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.





