[ad_1]
नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रूपाली म्हणजेच विरोचक राजाध्यक्ष कुटुंबाला नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणीवर हल्ला करायला सांगते. तर, विरोजकाच्या अंमलाखाली असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाने नेत्रा आणि तिच्या नवऱ्यावर हल्ला देखील केला आहे. यामध्ये नेत्रा जखमी होते. मात्र, या नवीन ट्विस्टचा प्रोमो प्रेक्षकांना अजिबातच आवडलेला नाही. या प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सध्या या मालिकेत उगाचच काहीही दाखवत असल्याचे, प्रेक्षकांचे म्हणणे आहे. शिकल्या सवरलेल्या घरातील ही लोकं इतकं बिनडोक कसं काय वागू शकतात?, असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांनी कमेंट्स माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
[ad_2]
Source link
