
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मित्रपक्ष संभाजी ब्रिगेटने युती तोडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑगस्ट २०२२ मध्ये संभाजी ब्रिगेड व उद्धव ठाकरे गटामध्ये युती झाली होती. मात्र दिलेला शब्द पाळला नाही, आश्वासने पूर्ण केली नाहीत, आमचा विश्वासघात केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.