
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना ते एका मोठ्या अपघातातून बचावले. दिलासादायक बाब म्हणजे यावेळी कोणालाही इजा झाली नाही. नायडू यांच्या अगदी जवळून एक ट्रेन गेली अगदी काही इंच अंतरामुळे ते बचावले, असे सांगण्यात येते. मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी नुकताच पूरग्रस्त भागाचा दौरा केला.