
अर्जुन चैतन्यला जाब विचारणार!
यावर अर्जुन चैतन्यला म्हणतो की, ‘आपण भांडलो असलो, तरी आपली मैत्री कायम होती. माझा तुझ्यावर विश्वास होता. मग, तू ही इतकी मोठी गोष्ट साक्षीला कशी काय सांगू शकतोस?’ आता अर्जुन चैतन्यला जाब विचारणार आहे. तर, निराश झालेला चैतन्य स्वतःच्या नशिबाला दोष देत, आपणही कुणालसारखं या जगातून निघून जायला पाहिजे, असं म्हणणार आहे. तर, चिडलेला अर्जुन चैतन्यच्या कानाखाली वाजवणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.







