
पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हल्ला केला त्यावेळी कारमध्ये राजेश टोपे यांचा चालक होता. राजेश टोपे हे निवडणूक प्रक्रियेसाठी बँकेत गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. हल्लेखोरांनी कारवर शाई, दगडफेक केली. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या कारचे मोठे नुकसान झालं आहे.






