
अंगठी हरवली हे ऐकताच अभिराम चांगलाच हादरला. तडक लीलाच्या घरी पोहोचलेला अभिराम अस्वस्थ होऊन संपूर्ण घरामध्ये अंतराची अंगठी शोधत होता. तर, लीला त्याची ही गंमत बघत होती. ती अंगठी का इतकी महत्त्वाची आहे, असा प्रश्न लीलाला पडला होता. यावर लीला अभिरामला म्हणते की, ‘फार फार तर ती अंगठी चार एक ग्रॅमची असेल. पंचवीस तीस हजाराच्या अंगठीसाठी तुम्ही इतके अस्वस्थ का होत आहात? अशा हजारो अंगठ्या तुम्ही सहज विकत घेऊ शकता’. मात्र, अभिराम तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून अस्वस्थपणे पूर्ण घरामध्ये ती अंगठी शोधत असतो.