हिंद महासागराखाली सापडलं हडप्पाहून प्राचीन समाधीस्त शहर; जादुई ठिकाण पाहून संशोधकही झाले होते अवाक्

0
1
हिंद महासागराखाली सापडलं हडप्पाहून प्राचीन समाधीस्त शहर; जादुई ठिकाण पाहून संशोधकही झाले होते अवाक्


Lost Civilization Discovery: संपूर्ण पृथ्वीच्या भूगोलात आणि इतिहासात डोकावलं असता काही अनपेक्षित गुपितं कायमच मानवाला भारावून सोडतात. मग ती प्राणीप्रजातींची उत्पत्ती आणि ऱ्हास असो किंवा मग आतापर्यंतच्या अनेक संस्कृतींच्या उदयाची गोष्ट असो. भूतकाळात घडून गेलेल्या अनेक गोष्टी अशा चमत्कारिकरित्या समोर येतात की, आधुनिकीकरणाच्या या काळातही त्यांचे पुरावे विचार करायला भाग पाडतात. असाच एक पुरावा खंबातच्या आखातात सापडला आणि संशोधकही हैराण झाले.

मानवी जीवनात लागलेला हा एक कमाल शोध ठरला जिथं, चक्क एक हरवलेलं शहरच संशोधकांसमोर आलं. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार 9500 वर्षांपूर्वी या शहराला जलसमाधी मिळाली होती. मात्र ते पाण्याखाली कसं नामशेष झालं याचं मूळ कारण मात्र अद्याप समोर आलं नसल्यानं या शहराबाबत बरेच सिद्धांत मांडण्यात येतात.

भारताच्या पश्चिमी किनारपट्टीपासून दूर…

नियमित प्रदूषण सर्वेक्षणादरम्यान, भारताच्या पश्चिमी किनारपट्टीपासून दूर खंभातच्या आखातात संशोधकांना हे ठिकाण सापडलं होतं. ज्यानंतर सोनार तंत्राच्या मदतीनं शहराच्या अनेक रचना आणि बांधकामांचे अवशेष समोर आले ज्या माध्यमातून पाण्याखाली गेलेल्या या शहराची कहाणी साऱ्या जगासमोर उलगडण्यात आली.

पाण्यात साधारण 120 फूट खोलवर हे शहर स्थिरावलं असून, त्याचं क्षेत्रफळ 5 मैल लांब आणि दोन मैल रुंद असल्याचं सांगण्यात आलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे या शहराच्या अवशेषांमधून भांडी, मोती, मूर्ती आणि काही मानवी अवशेषसुद्धा सापडल्याचं म्हटलं गेलं.

माध्यमांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार एनआईओटीच्या संशोधकंच्या चमूचं नेतृत्वं करणाऱ्या डॉ. बद्रीनारायण यांच्या माहितीनुसार हिमयुगाच्या अखेरच्या टप्प्यात समुद्राच्या वाढत्या पाणीपातळीमुळे मानवी सभ्यतेचं अस्तित्वं कसं धोक्याच आलं याचेच पुरावे या शहरामुळं समोर आले. हे शहर प्राथमिक स्वरुपात हडप्पाच्याही आधीपासून अस्तित्वात असल्याचे संदर्भ सांगण्यात आले.

कुठे आहे हे क्षेत्र?

खंभातच्या आखातातून समुद्राखाली दडलेल्या मानवी सभ्यतेच्या अवशेषांना प्रकाशझोतात आणलं जाण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वीसुद्धा अशी काही वृत्त प्रसिद्ध करण्यात आली होती. हा भाग अरबी समुद्रात गुजरातनजीक असून, मुंबई आणि दीव बेटाच्या अगदी उत्तरेकडे हे क्षेत्र असल्याचं सांगण्यात येतं. कैक वर्षांपासून हे क्षेत्र अनेक इतिहासकारांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्याचं पाहायला मिळालं आहे.





Source link