
CJI DY Chandrachud : देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. सायबर चोरटे रोज नव्या नव्या कलुत्या वापरुन लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडत आहेत. या साठी आता एआयचा वापर करून मोठ्या व्यक्तिच्या नावाचा वापर केला जात आहे. तर काही जणांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून लोकांकडे पैसे मागितले जातात. तर, काही वेळा थेट बँक खाते हॅक करून फसवणूक केली जाते. आता या सायबर चोरट्यांनी कळस गाठला असून भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून या चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे.