
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, काही आरोपी अद्यापही फरार आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्त्यारोप सुरू आहेत. मात्र, याप्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली. या हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.